मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०

विद्यार्थ्यांनी काय गुन्हा केला?

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्‍यातील थेऊर या गावी पोलिसांनी फ्रेंडशिप डे निमित्त आयोजित रिफ्रेशर पार्टीत सुमारे ऐंशी-नव्वद विद्यार्थ्यांना मद्यधुंद अवस्थेत पकडले, ही बातमी सर्वच वर्तमानपत्रांत तसेच विविधवाहिन्यांवर दिवसभर दाखविण्यात येत होते. हे सर्व प्रतिष्ठित घरची मुले असल्याचेही सांगितले जात होते. ही पार्टी कशी आयोजित केली, कसे पैसे जमा केले, त्याच प्रकारे कसे ते फार्म हाऊसवर रात्री धिंगाणा घालत होते, याचे सर्व रसभरीत वर्णन सर्वच माध्यमे दाखवीत होती. त्याच प्रकारे आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक वाहिनी त्याचे विश्‍लेषण करीत होती. त्याच प्रकारे त्यांच्या पालकांनाही सल्ले देताना दिसत होत्या. त्याच प्रकारे पोलिसही अशा थाटात आपल्या प्रतिक्रिया देत होते जसे त्यांनी फार मोठे जागतिक दर्जाचे कार्य केले आहे. त्याच प्रकारे आम्ही कसे कायद्याचे रक्षक आहोत, त्याच प्रकारे हे सर्व प्रतिष्ठितांच्या घरची मुले असली, तरी आम्ही त्यांच्यावर कशी कारवाई केली, याबद्दल सांगत होती; मात्र या विद्यार्थ्यांची यात काही चूक मानायला हरकत नाही. कारण ते सर्वजण एकांतात असलेल्या ठिकाणी कोणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी ही पार्टी करत होते. त्यामुळे त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही;
मात्र आजही अनेक ठिकाणी एखाद्या समाजातील एखाद्या राष्ट्रपुरुषाची किंवा एखाद्या धर्मातील सणानिमित्त मोठ्या आवाजात डीजे सिस्टिमची भिंत लावून भर रस्त्यावर मद्य पिऊन लोक धिंगाणा घालतात. त्याच प्रकारे या आवाजाचा व या मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांच्या दांडगाईचा किती मोठा त्रास लोकांना सहन करावा लागतो, याबद्दल प्रसारमाध्यमेही बोलत नाहीत किंवा पोलिसही कारवाई करताना आठळतात नाहीत. या विद्यार्थ्यांची जशी सर्वच प्रसारमाध्यमांनी मोठी बातमी केली, तशी बातमी या सण-उत्सवांनिमित्त भर रस्त्यावर नशा करून धांगडधिंगा घालणाऱ्यांवर व लोकांना वेठीस धरणाऱ्यांवर कोणी चकारशब्द लिहिताना दिसत नाही किंवा पोलिसांत गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर कोणी कार्यवाही केल्याचे आढळत नाही, हे असे का घडते. याचे उत्तर मिळविण्यासाठी पोलिस आणि प्रसारमाध्यमांनीही आपल्या भूमिकांवर पुन्हा विचार करण्याची गरज मला वाटते.

४ टिप्पण्या:

  1. You are right, but I think students & organizers made mistake. Organizers should have taken permissions from authorities before starting party. Organizers must have tried to save money. Also as per law everyone who wants to take drinks, must take license. If they would have took permits for all students and party, no action would have taken. Organizers collected 300 INR per person, should have collected 400-500 per person and get permits. It's mistake of organizers and party goes, who don't care. I hope these students will follow law, next time and will not face it again.

    उत्तर द्याहटवा
  2. Aho hi sagli mula 19-20 varshachi aahet. Ata daru pinyacha vay majhya mahiti pramane 21+ aahe. Mag tasahi hi mula gunha kinwa chuk karatach hoti. Ya aslya partyan madhun nantar vikruti yete he khara asla tari te sagla tikde theur madhe kuthlyashya kopryat karat hote he pan kharay. Pan tumcha jo mudda aahe loud speakers laun rastyvar dhangad-dhinga karaycha, to yogya aahe, pan kasay aplya rajyaghatane nusar tyala kadhihi nirbandhit karta yenar nahi. Ani karaycha kuni prayatna kelach tar tya netyachye kinwa mahapurushache samarthak ghari yeun tod phod kartat. Rastyat gathun chop detat. Tya mule tumcha mudda agdi yogya aahe ki he prakar Police asech sodun detat. Pan ya mule tya Theur madhe gondhal ghalnarya mulanni kahi chuk keli nahi asa mhanta yenar nahi.

    उत्तर द्याहटवा
  3. हा सगळा दिखावूपणा आहे. नेहमीप्रमाणे. पोलिसांना प्रसिद्धी हवी होती आणि मीडियाला काहीतरी पांचट विषय. त्या मुली कशा शॉर्ट स्कर्टमध्ये होत्या वगैरे. त्यांनी काय करावं, यावर चर्चा करण्यापेक्षा आपण काय करतो, हे तपासायला हवं.

    उत्तर द्याहटवा