गुरुवार, २२ एप्रिल, २०१०

फालतू क्रिकेट वेड

सध्या आयपीएलचा जोर आहे. प्रत्येक ठिकाणी क्रिकेट मॅचबद्दल बोलणारे दिसतात. त्याच प्रकारे पहावे तिकडे क्रिकेटचीच माहिती पहावयाला मिळते आहे. त्याच प्रकारे प्रसारमाध्यमेही वरच्यावर या क्रिकेटच्याबाम्यांवरच जास्त भर देताना दिसत आहेत. त्यामुळे सर्व वातावरण भारत क्रिकेटमय झाला आहे, असे सध्या वाटावे. त्या क्रिकेट ज्वराने लहान-मोठे, तरुण-तरुणी झपाटले आहेत. सकाळी उठल्यापासून लोक क्रिकेटवर चर्चा करण्यास सुरवात करतात. त्यात गरीब असोवा श्रीमंत, नोकर असोवा मालक असे सर्वच जण क्रिकेटपाई क्रेझी झालेले दिसतात; मात्र या लोकांना क्रिकेट वितिरिक्त किती समस्या उग्र आहेत याचे भान राहिलेले नाही. आज प्रत्येकाला राजकारणी व पैसेवाले क्रिकेटच्या नादाला लाऊन आपले खिसे भरण्यात धन्यता मानत आहेत. क्रिकेटमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टार होत असून, त्याच प्रकारे खेळाडू कोट्यवधी रुपये काही मॅच खेळून कमावित असतात. मात्र सामान्य लोक आपला रोजगार बुडवून या मोठ्या लोकांचा सट्टा पहात घरीच बसतात. तर काही जण कार्यालयांतही दूरचित्रवाहनीसमोर बसून काम करतात. अशा प्रकारे जर लोक क्रिकेटपाई लोक वेडे होत आहेत व भांडवलदार याचा भायदा उठवत आहेत. तरी लोकांनी वेळीच सावध व्हावे. एखाद्या खेळाच्या लोकांनी एवढ्या आहारी जाणे चांगले नाही देशाच्याही व नागरिकांच्याही हिताचे नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा