या ब्लॉगवर दैनंदिन घडणाऱ्या एखाद्या घटनेबद्दल मला काय वाटते, ते मी लिहीतो. तुम्हालाही असे काही लिहायचे असल्यास प्रतिक्रिया पाठवाव्यात.
मंगळवार, ६ एप्रिल, २०१०
हे कधी बदलणार.
आज आपल्या देशासमोर महागाई, गरिबी, दहशतवाद आदी प्रश्न आहेत; मात्र या प्रश्नांचे देणे घेणे कोणालाही नाही. प्रत्येक जण स्वतःच्या संपत्तीत वाढ करण्याच्या मागे लागला आहे. कारण दुसरा गरीब झाला तरी चालेल; पण माझ्याकडे संपत्ती पाहिजे. आज समाजात फक्त पैशांना किंमत आहे. तो कसा मिळविला हा दुय्यम विषय आहे. पैसा आहे, तर तुम्हाला सर्वत्र मान आहे. तो तुम्ही कसा मिळविला या पेक्षा आहे याला महत्त्व आहे. त्यामुळे भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्याच प्रमाणे ज्यांनी हे सर्व रोकायला हवे आहे, त्यांचे हात यात बरबटलेले आहेत. त्यामुळे ज्यांनी देश वायवायला हवा तेच देश विकायला निघाले आहेत. प्रत्येक वेळी सामान्यांनी जाकरूक राहिले पाहिजे, यांनी जाकरूक राहिले पाहिजे असे सांगितले जाते. पण ते दुसऱ्यासाठीच असते. आपण ते नियम पाळायचे नसतात. नियम दुसऱ्यांसाठी असतात. आपल्यासाठी नियम पाळायसाठी नसतात तर तोडण्यासाठी असतात. मी म्हणतो हे देशाचे चित्र कधी बदलणार.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा